मला असं वाटतं समाज म्हणजे…
- सतत माणुकसी जपता यावी यासाठी मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात काही समजूतदार माणसांनी जन्माला घातलेली व्यवस्था.
- सर्वांनी माणुसकी जपली तर सर्वच माणसांना जगणे सोपे आणि सुखकर होईल कदाचित ह्याच हेतूने निर्माण केलेली व्यवस्था.
- कदाचित सम + आज म्हणजे कोणत्याही क्षणी/दिवशी सर्वांच्या अस्तित्वाला, गरजांना आणि भावनांना समान मान असतो ह्याची जाणीव असावी असा लपलेला संदेश.
- सर्वांच्या मानवाधिकारांचे जतन करता यावे म्हणून सकस मानसिकता जतन करा असा संदेश कायम देता यावा ह्याची तरतूद.
समजलं तर खरंच सोपं आहे… पटतंय का?